सोलापूर/(शिवाजी सावंत) प्रतिनिधी- अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमी पूजनाचे औचित्य साधून चिंचोली काटी येथे वृक्षारोपण मोठ्या उत्साहाने पार पडले. चिंचोली काटी येतील धर्मराज मंदिर परिसरात सुमारे 50 वेगवेगळी झाडे लावण्यात आली यामध्ये अशोक, बहावा, करंज, चिंच, सिल्वर ओक,गोलमोहर इत्यादी झाडांची लागवड करण्यात आली.अश्या मंगल प्रसंगी वृक्षारोपण करून चिंचोली काटीतील तरुणांनी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.
चिंचोली काटी औद्योगिक वसाहतीमुळे गेल्या 2 दशकापासून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे त्यामुळे हा परिसरात दूषित हवेमुळे प्रदूषित झाला आहे,हाच विचार करून गावातील काही तरुण सामाजिक कार्याची आवड असलेल्या तरुणांनी हा अभिनव उपक्रम राबवला आहे.आणि साहजिकच आज हिंदू धर्माचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र यांच्या अयोध्येतील मंदिर भूमिपूजनाचा सुवर्ण क्षण येथील तरुणांनी अश्या पद्धतीने साजरा केला.प्रभू श्रीरामचंद्र कि जय या शुभनामाने परिसर दणाणून गेला होता.यंदा पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्यामुळे प्रत्येक झाड हे जगेलच असा सुर या तरुणांमधून ऐकायला मिळत होता.या झाडांची निगा राखण्यासाठी एखादा माळी काम करणारा व्यक्ती पूर्णवेळ देण्याची मागणी ग्रामपंचायत चिंचोली काटी कडे करण्यात आली आहे.
यावेळी अविनाश कोळी , पत्रकार शिवाजी सावंत चकोर नागणे, रोहित पाटील, पृथ्वीराज पवार, गणेश आलदार, प्रशांत परीट,बापू भोसले, राजाराम धोत्रे, शिवाजी मडोळे, कोंडीलाल शेख आदी उपस्थित होते.