Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
मुंबई- उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये माणगाव येथील महिंद्रा कंपनीबाबत आढावा बैठक संपन्न झाली. महिंद्रा कंपनीचे माणगांव येथील युनिट बंद झाल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांना कोरोनाकाळात कौटुंबिक गैरसोय होऊ नये, यादृष्टीने कंपनी व्यवस्थापनाने विचार करावा. शिवाय त्यांच्या वयाप्रमाणे व अनुभवाप्रमाणे माणगांव व्यतिरिक्त इतर ठिकाणच्या युनिटमध्ये पुढे सेवेत घेण्यात यावे, असेही कु. तटकरे यांनी सांगितले. राज्यात उद्योगाला प्रोत्साहन देतांनाच अशाप्रसंगी कामगारांना न्याय मिळावा यासाठी कंपनीने जुन्या अनुभवी कर्मचाऱ्यांना भविष्यात नव्याने कंपनी सुरू झाल्यास प्राधान्य द्यावे असेही राज्यमंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.
यावेळी माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी कर्मचाऱ्यांना दिला जाणाऱ्या मोबदल्याबाबत कंपनीकडून सहानुभूतीपूर्वक फेरविचार व्हावा, असे मत यावेळी मांडले. या बैठकीला स्थानिक कामगार संघटनेचे पदाधिकारी व महिंद्रा कंपनीचे अधिकारी आदींची उपस्थिती होती.