Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
नवी दिल्ली Bank – प्रचंड बहुमताच्या जोरावर सलग दुसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारनं अनेक मोठे निर्णय घेतलं आहेत. विविध क्षेत्रात मोदी सरकारनं खाजगीकरण करण्यास सुरूवात केली आहे. रेल्वे (Railway), रस्ते (Road), कंपन्यायांच खाजगीकरण करण्यावर मोदी सरकारचा भर आहे. अशातच देशातील सार्वजनिक बॅंकांच्या खाजगीकरणबाबत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Finance Minister Nirmala Sitaraman) यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
100 कोटी खंडणीचे टार्गेट दिले नव्हते, सचिन वाझेचा मोठा खुलासा
Bank केंद्र सरकार वर्ष 2021-2022 मध्ये दोन सार्वजनिक बॅंकाचं खाजगीकरण करणार होतं. याबाबत कारवाई करण्यात येत आहे. अशातच दोन्ही बॅंकांच्या खाजगीकरण करण्यासाठी संसदीय समितीची मंजूरी आवश्यक असते. पण केंद्रीय अर्थविषयक समितीनं अद्यापी खाजगीकरणाबाबत कसलाही निर्णय घेतला नाही, अशी माहिती निर्मला सीतारमन यांनी दिली आहे. सरकारनं दोन सार्वजनिक बॅंका Bank आणि एक विमा कंपनीचं खाजगीकरण करण्याचं ठरवलं आहे. या व्यवहाराच्या माध्यमातून तब्बल 1.75 लाख करोड रूपये निधी उभा करण्याचं उदिष्ट्य ठेवलं आहे. परिणामी सरकार बॅंकाचं Bank खाजगीकरण करणार या मुद्द्यावर ठाम आहे. सरकारवर बॅंकांच्या खाजगीकरणावरून विरोधक प्रचंड टीका करत आहेत. दरम्यान, निर्मला सीतारमन यांनी बॅंकेच्या मुद्द्यावर संसदेत सरकारतर्फे उत्तर दिलं आहे. काही काळापूर्वी आरबीआयनं खाजगीकरणाच्या प्रक्रियेत बॅंक या शब्दाच्या वापराबाबत शंका उपस्थित केली होती. तर आता सरकार खाजगीकरणावर ठाम असल्यानं हा गुंता वाढण्याची शक्यता आहे.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews