Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
मुंबई- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला सुरक्षित, निर्भेळ आणि आरोग्यदायी अन्न मिळावे यासाठी अन्न सुरक्षा अंकेक्षण (फूड सेफ्टी ऑडिट) करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. या संदर्भात त्यांनी बुधवारी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या जातात त्यात, हात धुणे, सामाजिक अंतर राखणे या बरोबरच स्वच्छ आणि व्यवस्थित शिजवलेले अन्न खाणे यावरही भर दिला जातो. लॉकडाऊननंतर आता हॉटेल्स, आणि बाहेरील खाद्य पदार्थ विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. शिंगणे यांनी ही मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत.
मानकांची पूर्तता करा आणि प्रमाणपत्र घ्या
अन्न पदार्थ पुरवणाऱ्या व तयार करणाऱ्या आस्थापनांनी त्यांना दिलेल्या निकषांची पूर्तता करावी आणि केंद्र शासनाच्या फूड सेफ्टी ॲण्ड स्टॅण्डर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) यांनी अधिकृत मान्यता दिलेल्या 26 अंकेक्षण संस्थांमार्फत (ऑडिट एजन्सी) ऑडिट करुन घ्यावे. आस्थापनानी अशा प्रकारे थर्ड पार्टी ऑडिट झाल्यानंतर या मानकांची पूर्तता करणाऱ्या आस्थापनांनी मानकांची समाधानकारक पूर्तता केली असेल तर या ऑडिट संस्थांमार्फत अन्न तयार करणाऱ्या आस्थापनांना प्रमाणपत्र दिले जाईल. यामुळे ग्राहकांना सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न पदार्थ पुरविले जाण्याची हमी मिळणार आहे.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143